मुंबई : ज्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्यायांच्या पत्राचा आधार घेऊन आजचा शपथविधी झाला तो चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे, राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी कोणते आमदार उपस्थित आहेत त्यांची उपस्थिती नोंदवून घेण्यासाठी घेतलेल्या सह्यांचे ते पत्र होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे .
राज्यातील राजकारणात भूकंप घडणारी घटना घडल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीच्या आमदारांनी सह्या केलेले पत्र हे उपस्थिती दर्शवण्यासाठी केलेल्या सह्यांचे पत्र होते असा खुलासा केला आहे.
काल रात्री झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोण कोण आमदार उपस्थित आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या , यांचे पत्र राज्यपालांकडे सत्ता स्थापन करताना सादर करण्यात आल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे . या पत्रांमध्ये ज्या आमदारांची नावे आहेत त्यापैकी अनेकजण शरद पवारांना येऊन भेटले. यासंदर्भात अधिक तपशीलवार माहिती दुपारी साडेबारानंतर शरद पवारांसोबत झालेल्या पत्रकार परिषदेनंतर देण्यात येईल येईल असेही नवाब मलिक यांनी सांगितले
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.