...आर आर आबांनी दिला होता अलमट्टी धरण फोडण्याचा इशारा - अजित पवार

...आर आर आबांनी दिला होता अलमट्टी धरण फोडण्याचा इशारा - अजित पवार

मुंबई : आर आर आबांनी अलमट्टी धरण फोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कर्नाटक सरकार ताळ्यावर आले होते आणि त्यांनी धरणातून पाणी सोडले होते अशी आठवण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितली. ते म्हणाले आबा काही खरोखर तेथे जाऊन धरण फोडणार नव्हते पण जनतेच्या हितासाठी कधी कधी राज्यकर्त्यांना धाक दाखवायला लागतो, आबांचा तो इशारा त्या व्युहरचनेचाच एक भाग होता असेही स्पष्टीकरण पवार यांनी यावेळी दिले. 


सांगली आणि कोल्हापूर येथे महापूर आला असून या दोन्ही शहरातील पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली असून दैनंदिन जीवन अत्यंत विस्कळीत झाले आहे. या स्थितीला कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणीसाठा जबाबदार असून त्यामुळे या दोन शहरातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. अलमट्टी धरणातील पाणीसाठा तातडीने कमी करण्याची गरज असूनही कर्नाटक सरकार आडमुठेपणा करून त्या धरणातून अत्यंत कमी पाण्याचा विसर्ग करत आहे. तेथील अधिकारी तर महाराष्ट्र सरकारच्या विनंतीला सातत्याने केराची टोपली दाखवत आहेत. त्या धरणातून पाण्याचा जो विसर्ग केला जात आहे त्याबद्दल दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यामुळे या दोन शहरातील संकट अधिकच तीव्र होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com