फडणवीस-ठाकरे यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा - अजित पवार

 फडणवीस-ठाकरे यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा - अजित पवार

पैठण : कोल्हापूर-सांगली भागात पुराने थैमान घातले, अनेकांचे बळी गेले, सरकारला मात्र तिकडे बघायला वेळ नाही. शिवसेना-भाजपचे नेते प्रचार यात्रा काढण्यात मग्न होते. त्यांच्यात मुख्यंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. फडणवीस आणि ठाकरे यांच्यातच मुख्यमंत्री होण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. 

शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील शुभारंभ पैठण तालुक्‍यातील बालानगर येथून करण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत या यात्रेला सुरूवात झाली. यावेळी अजित पवारांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. शेतकरी कर्जमाफी कशी फसवी आहे हे सांगताना अजित पवार म्हणाले, भाजप शिवसेनेचे सरकार दीड लाख रुपये घेवून शेतकऱ्यांना कर्जमाफी देत आहे. अशी कर्जमाफी हे लबाडाचं आमंत्रण आहे. तुमचा हेतू प्रामाणिक असेल तर मग पैसे भरण्याची अट घालता कशाला ? 

खरीपाच्या विम्यासाठी रबी पीक विमा कंपनीवर मोर्चा काढणाऱ्या शिवसेनेला शेतकऱ्यांच्या पिकांची सुध्दा माहीती नाही. अशा नेते मंडळी आणि सरकारमध्ये बसलेल्यांना शेतकऱ्यांचे दुःख कधीच कळणार नाही. या सरकारच्या काळात बॅंका, कंपन्या, उद्योग बंद पडून बेरोजगाराची संख्या वाढते आहे. पण ढिम्म सरकार पावले उचलायला तयार नाही, नुसता खेळखंडोबा चालवला आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन आणि मन परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची ही शिवस्वराज्य यात्रा असल्याचे अजित पवारांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com