आमचं खत कसदार...महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणारच : आदित्य ठाकरे

'आमचं खत कसदार आहे त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होईल' असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांना सरकारमधील मंत्री दबाव टाकून फोडत असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. यावर पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारलं असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
आमचं खत कसदार...महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणारच : आदित्य ठाकरे

मुंबई : 'आमचं खत कसदार आहे त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होईल' असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांना सरकारमधील मंत्री दबाव टाकून फोडत असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. यावर पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारलं असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना- भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर नुकतेच शिवसेनेत दाखल झाले आहेत.राष्ट्रवादीतील आणखी नऊ नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय.यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना-भाजपवर टीका केली आहे. याबाबत  प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे यांना छेडलं असता त्यांनी 'आमचं खत कसदार आहे, त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणारच' अशी प्रतिक्रिया दिली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंधेरीतील मरोळ येथे पालिकेच्या मैदानात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.आदित्य ठाकरे यांच्यासोबत 1100 नागरिकांच्या हस्ते एकाच वेळी एकाच ठिकाणी अकराशेहुन अधिक झाडं लावण्याचा उपक्रम पार पडला.सध्या राजकारणातील इनकमिंग पेक्षा पावसाचं इनकमिंग महत्वाचं असल्याची प्रतिक्रिया ही आदित्य ठाकरे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com