फडणवीस साहेब 'बांगड्यां'च्या टिकेबाबत माफी मागा : आदित्य ठाकरेंनी सुनावले

वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्यावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे चांगलेच संतापले आहेत
Aditya Thackeray Angry over Devendra Fadanavis Statement
Aditya Thackeray Angry over Devendra Fadanavis Statement

मुंबई : वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्यावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे चांगलेच संतापले आहेत. 'शिवसेनेने बांगड्या भरल्या असल्या तरी आम्ही भरलेल्या नाहीत,' असे सांगत फडणवीस यांनी पठाण यांच्यावर कारवाई न केल्याबद्दल शिवसेनेवर टिका केली होती. 

यावर आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत त्याला उत्तर दिले आहे. ''मी सहसा कुणाला उत्तर देत नाही. पण बांगड्यांबाबतच्या आपल्या वक्तव्याबाबत कृपया माफी मागा. जगातल्या सर्वात शक्तीशाली महिला बांगड्या परिधान करतात. राजकारण चालत राहील, पण आपण आपले गैरसमज बदलले पाहिजेत. मात्र अशा प्रकारे कुणाचा अपमान करणे योग्य नाही,'' असे आदित्य यांनी फडणवीसांना ऐकवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com