उद्धव ठाकरेंवरच कारवाई हवी : प्रमोद जठार

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील आठ पैकी कणकवली विधानसभा हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असताना तेथे शिवसेनेने एबी फॉर्म देऊन युतीला तडा दिला आहे.
Nitesh_Rane_Uddhav_Thakre
Nitesh_Rane_Uddhav_Thakre

वैभववाडी :  रत्नागिरी-सिंधुदुर्गातील आठ पैकी कणकवली विधानसभा हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असताना तेथे शिवसेनेने एबी फॉर्म देऊन युतीला तडा दिला आहे. त्यामुळे एबी फॉर्म देणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर महायुतीने कारवाई करायला हवी, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे व्यक्त केले.

येथील स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात जठार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी सुधीर नकाशे, मंगेश गुरव, दिगंबर मांजरेकर, रत्नकांत कदम आदी उपस्थित होते. 

जठार म्हणाले, "रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ पैकी कणकवली हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आहे. तेथे कोण उमेदवार द्यायचा हा आमच्या पक्षाचा प्रश्‍न होता; परंतु शिवसेनेने विश्‍वासघात करीत सतीश सांवतांना एबी फॉर्म दिला. महायुतीला तडा देण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे महायुतीने सर्वात पहिली कारवाई त्यांच्यावर करायला हवी. "

ते म्हणाले, ""कणकवलीतुन सतीश सावंत यांची उमेदवारी ही बेकायदेशीर आहे. वेळ गेलेली नाही. शिवसेनेने अजुनही कणकवलीतून माघार घ्यावी. आम्ही उर्वरित दोन मतदारसंघातून माघार घ्यायला तयार आहोत. सांवतवाडी आणि कुडाळचे भाजप पुरस्कृत उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळे त्या उमेदवारांसह मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत, असा सोशल मीडियावर फिरणारा मेसेज हा फेक आहे. पक्ष माझ्यावर कधीही कारवाई करणार नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com