विरोधकांची इच्छा पूर्ण होणार नाही : आशुतोष काळे 

जनतेचे प्रश्‍न सोडविणारे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल.
aashutosh kale criticize opponents
aashutosh kale criticize opponents

कोपरगाव (नगर) : "कोपरगावचे प्रश्‍न सोडविण्याचा धडाका आपण असाच कायम ठेवू. काहींना वाटते, की हे सरकार पडेल आणि पुन्हा निवडणुका होतील; मात्र त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही. जनतेचे प्रश्‍न सोडविणारे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल,'' असा विश्‍वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

नगरपालिकेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार काळे बोलत होते. या निमित्ताने गेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आमदार काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे एकाच व्यासपीठावर आले. श्रुती वढणे अध्यक्षस्थानी होत्या. 

कोपरगावच्या विकासाबाबत काळे म्हणाले, "शहराच्या पाणीयोजनेच्या पाच क्रमांकाच्या साठवण तलावाच्या खोदाईचे काम सुरू आहे. विस्थापित टपरीधारकांसाठी व्यापारी संकुल उभारायचे आहे. भुयारी गटारे, रस्त्यांचे सुशोभीकरण व अन्य कामांसाठी दोन कोटी एकोणीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com