म्हणून लगेचच शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो:  आशुतोष काळे 

या वेळी कीर्तनकार बाळकृष्ण गडकर म्हणाले, माजी खासदार शंकरराव काळे हे वैराग्य आणि विवेकाचे प्रतीक होते. रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा त्यांनी पुढे चालविला. एका अर्थाने त्यांनी संत मंडळींनी दाखविलेल्या वाटेने आपली वाटचाल केली.
म्हणून लगेचच शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो:  आशुतोष काळे 

कोपरगाव (नगर) : अवेळी पावसाने तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील विजय आपण साधेपणाने साजरा केला. माजी खासदार शंकरराव काळे यांनी केलेल्या संस्कारामुळे ही भावना आमच्या परिवारात रूजली आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

माजी खासदार शंकरराव काळे यांच्या सातव्या पुण्यतिथी समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अशोक काळे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

काळे म्हणाले, कोपरगाव मतदारसंघातील जनतेने मोठा विश्‍वास दाखवून आमदारकीची संधी दिली. एका अर्थाने माजी खासदार काळे यांच्या स्वप्न पूर्ण केले. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच आपण शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी बांधावर गेलो. सरकार दरबारी निवेदने दिली. पाठपूरावा सुरू केला आहे. विधानसभेत आपण मतदारसंघातील जनतेचे प्रश्‍न मांडू त्यासाठी भांडू. मतदारसंघाच्या खुंटलेल्या विकासाला गती देऊ. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com