उस्मानाबाद : "सिंचन घोटाळ्यात सातत्याने कारवाई सुरू आहे. शंभरपेक्षा जास्त प्रकरणात फिर्याद दाखल करण्यात आली आहे,'' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नाची उत्तरे देताना श्री. फडणवीस म्हणाले, "आतापर्यंत जवळपास साठ प्रकरणात शिक्षा झाली आहे. न्यायालयात जे फौजदारी खटले दाखल झाले आहेत त्यातही आपण दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. पंचवीसपेक्षा जास्त एफआयआर वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. न्यायालयाने आणखी माहिती मागविली आहे. ती आम्ही देणार आहोत.''
उसाच्या प्रश्नाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "उसाला पाणी जास्त लागते म्हणून ऊस लावू नका असे म्हणता येणार नाही. त्याऐवजी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून कमी पाण्यात उसाचे अधिक उत्पादन घेण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी सूक्ष्म सिंचनासाठी वाढीव तरतूद शासनाने केली आहे.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.