18 खासदारांचा गड आला, पण खैरें सारखा सिंह हरला, एकनाथ शिंदेंना खंत 

18 खासदारांचा गड आला, पण खैरें सारखा सिंह हरला, एकनाथ शिंदेंना खंत 

औरंगाबाद: या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदारांचा गड आला ,मात्र चंद्रकांत खैरे यांच्यासारखा सिंह हारल्याचं दुःख शिवसेना पक्षप्रमुखांनाही आहे. कदाचित आपली काही गणितं चुकली असतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम असलेल्या औरंगाबादमध्ये हार मानावी लागली. इथे खैरे हरले नाहीत तर शिवसैनिक आणि हिंदुत्व हरले असल्याची खंत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्‍त केली. 

शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेचा 34 वा वर्धापन दिन सोहळा शनीवारी (ता. आठ) पार पडला. यानिमित्ताने आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात पालकमंत्री बोलत 
होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारानं प्रभावित झालेल्या या जिल्ह्यात यापुढंही हिंदुत्व कायम टिकवायचं आहे. 

शिवसेनेचे काम केवळ निवडणुकांपुरतं काम नसतं तर बाराही महिने असते. खैरे यांच्या पराभवाचं दुख सर्वांनाच आहे. शिवसैनीकांच्या मनाला वेदना देणारी खूप मोठी जखम आहे. तुम्ही शिवसेनेचे वाघ आहात आणि जेंव्हा वाघाला जखम होते तेंव्हा जखमी वाघ चवताळून पुन्हा त्वेषाने उठल्यानंतर आपले लक्ष्य गाठल्याशिवाय राहात नाही. या जखमेचा वचपा काढल्याशिवाय आणि आलेलं हिरवं संकट घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा सर्वांनी निर्धार करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. 

निवडणुकीत काही चुका झाल्या असतील, मात्र यापुढे त्यांची पुनरावृत्ती नको असा या मेळाव्याच्या निमित्ताने सर्वांनी संकल्प करु या असे आवाहन करुन हिंदुत्वाचा भगवा पुन्हा औरंगाबादवर डौलाने फडकवण्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावुन उभा रहायला तयार राहीन अशी ग्वाही देखील शिंदे यांनी दिली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com