जनता भोळी आहे असे शिवसेनेने समजू नये : सत्यजीत तांबे 

.
Satyajit-Tambe
Satyajit-Tambe

कोल्हापूर : शिवसेनेने गेली पाच वर्ष भाजपला विरोध करण्याची जी भूमिका ठेवली किंवा तसे भासवले तो तद्दन खोटेपणा होता. जनता भोळी आहे आणि आपण त्या जनतेला कसेही वागवू शकतो अशा भ्रमात शिवसेना भाजपची मंडळी आहेत. त्यांनी या भ्रमात राहू नये , अशी टीका महाराष्ट्रा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  सत्यजीत  तांबे यांनी केली आहे . 

मागच्या पाच वर्षात शिवसेनेने भाजपच्या चुका दाखवत, टीका करत असे भासवले की आम्ही विरोधकाची भूमिका पार पाडत आहोत. मात्र प्रत्यक्षात ही मॅच फिक्सिंगच होती हे आता सिद्ध झाले आहे, या अभद्र युतीने मात्र अनेक शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. 

उद्धव ठाकरे आणि शिवसेना हे संधिसाधू आहेत आणि भाजप हा निर्लज्ज पक्ष आहे हेच यातून स्पष्ट होते. सत्तेसाठी ही युती होत असली तरी जनता मात्र या अभद्र युतीला स्वीकारणार नाही, शिवसेनेने उरली सुरली विश्वासार्हता युती करून गमावली आहे अशी प्रतिक्रिया सत्यजीत  तांबे यांनी दिलीय . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com