संकटमोचक गिरीश महाजन 'लॉंग मार्च' थांबवणार काय?

गुजरातला जाणारे पाणी अडवावे, शेतकऱ्यांना दिलेल्या आश्‍वासनांची अंमलबजावणी करावी. या मागण्यांसाठी किसान सभेतर्फे आज पुन्हा एकदा नाशिक - मुंबई लॉंग मार्च काढण्याची घोषणा झाली. त्यासाठी विविध भागातुन शेतकरी दाखल झाले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तडजोडीसाठी सरकारचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन खास हेलीकॉप्टरने नाशिकला आले. मोर्चेकऱ्यांशी चर्चा करुन मार्च थांबविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
संकटमोचक गिरीश महाजन 'लॉंग मार्च' थांबवणार काय?

नाशिक : गुजरातला जाणारे पाणी अडवावे, शेतकऱ्यांना दिलेल्या आश्‍वासनांची अंमलबजावणी करावी. या मागण्यांसाठी किसान सभेतर्फे आज पुन्हा एकदा नाशिक - मुंबई लॉंग मार्च काढण्याची घोषणा झाली. त्यासाठी विविध भागातुन शेतकरी दाखल झाले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तडजोडीसाठी सरकारचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन खास हेलीकॉप्टरने नाशिकला आले. मोर्चेकऱ्यांशी चर्चा करुन मार्च थांबविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

विविध भागातुन लॉंग मार्चसाठी सकाळपासुनच येथे शेतकरी दाखल होत आहेत. त्यासाठी मुंबई नाका येथील बस स्थानक रिकामे करण्यात आले. तेथे मोर्चेकऱ्यांना थांबविण्यात आले. किसान सभेचे नेते अशोक ढवळे, आमदार जे. पी गावीत, डॉ. डी. एल. कराड, अजित नवले यांसह विविध नेते येथे दाखल झाले होते. यावेळी मनसेचे माजी आमदार नितीन भोसले त्यात सहभागी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांनीही मुंबईनाका येथे भेट देऊन लॉंग मार्चला पाठींबा व्यक्त केला. या पार्श्‍वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन तातडीने मुंबईहून नाशिकला दाखल झाले. त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शासनातर्फे ठोस आश्‍वासन देऊन व नेत्यांशी चर्चा करुन मार्च स्थगित करावा असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सायंकाळी सात पर्यंत मोर्चेकरी पुढच्या प्रवासाला रवाना न होता मुंबई नाका बसस्थानकतच थांबून होते.

पोलिसांकडून त्यांना शासनातर्फे चर्चेसाठी निरोप देण्यात आला होता. मात्र, यापूर्वी सरकारने दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. चौतीस हजार कोटींची कर्जमाफी जाहिर केली. प्रत्यक्षात केवळसहा हजार कोटींचेच वितरण झाले. यासह स्वामीनाथन आयोग, गुजरातला वाहुन जाणारे पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी अडवावे आणि ते नाशिकच्या येवला, नांदगावसह दुष्काळी भाग असलेल्या धुळे, जळगाव भागासाठी द्यावे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा द्याव्यात आदी मागण्या आहेत. त्याव ठोस निर्णय व विश्‍वास वाटेल अशी कार्यवाही होत नाही. त्यामुळे लॉंग मार्च काढण्यावर ठाम असल्याचे आमदार गावीत यांनी सांगीतले. ठाणे तसेच अन्य भागात मोर्चेकऱ्यांची वाहने अडवुन त्यांना पोलिसांनी रोखले. मात्र दडपशाही करु नये. मागण्या मान्य कराव्यात. लॉंग मार्च काढण्याची आम्हालाही हौस नाही. दडपशाही झाल्यास वेगळे परिणाम होतील अशा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईला जाऊन सरकारकडे प्रश्न मांडण्याएैवजी सरकारचा प्रतिनिधी म्हणुन मी स्वतः मोर्चेकऱ्यांकडे आलो आहे. किसान सभेचे प्रश्न सरकार गांभीर्याने सोडवेल. यापुर्वीही सरकारने जी जी आश्वासने दिली ती सर्व पाळली आहेत. त्यांनी मार्च काढण्यावर ठाम राहु नये. चर्चेतुन मार्ग निघेल याविषयी मी आशावादी आहे. - गिरीष महाजन, जलसंपदा मंत्री.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com