हवामान खाते व बियाणे उत्पादक कंपन्यांचे साटेलोटे आहे का?  : विखे पाटील

राज्यात भीषण वीज टंचाई निर्माण झाली असून, कोळसा नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत तिथे महाराष्ट्राचा कोळसा वळविण्यात आल्याचा आरोप श्री. चव्हाण यांनी केला.
vikhe- chavan
vikhe- chavan

औरंगाबाद,: "हवामान खात्याने यंदा 102 टक्के पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात अनेक जिल्ह्यात केवळ 63 टक्के पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. हवामान खाते व बियाणे उत्पादक कंपन्यांचे साटेलोटे आहे का? याची चौकशी झाली पाहिजे ,"अशी मागणी विराधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

मराठवाडा, विदर्भ, खान्देशच्या दुष्काळासंदर्भात कॉंग्रेसची चिंतन बैठक शनिवारी औरंगाबाद येथे घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. राधाकृष्ण विखे बोलत होते . यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते .

 यावेळी  सरकारला धारेवर धरताना श्री . अशोक  चव्हाण म्हणाले, "मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळाची मोठी दाहकता आहे. शासनाने मात्र आठपैकी पाच जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त दाखवून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे."  
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com