कुणाशी युती होवो न होवो, आमचा उमेदवार उभा राहणारच : राजू शेट्टी

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला असून २०१९ मध्येही आमची युती कुणाशी होवो अथवा न होवो आमचा उमेदवार उभा राहणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, असून निवडणूक लढविणार असल्याचे संकेत खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिले.
कुणाशी युती होवो न होवो, आमचा उमेदवार उभा राहणारच : राजू शेट्टी

भोसे :  पंढरपूर विधानसभा मतदारसंघ हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला असून २०१९ मध्येही आमची युती कुणाशी होवो अथवा न होवो आमचा उमेदवार उभा राहणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, असून निवडणूक लढविणार असल्याचे संकेत खासदार राजू शेट्टी यांनी येथे  दिले.

तालुक्यातील हुन्नुर येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकय्रांच्या प्रश्नावर दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष समाधान फाटे,कार्याध्यक्ष विजय रणदिवे,विष्णू बागल,अ‍ॅड राहूल घुले,नवनाथ माने,अमोल हिप्परगी,श्रीमंत केदार,अनिल बिराजदार,विजयकुमार पाटील,तात्या सावंत मल्लिकार्जुन भांजे,विकास पुजारी हणमंत यमगर,विठठल कोळेकर,आबा खांडेकर,भाऊसाहेब गरंडे,नामदेव मेडीदार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शेटटी म्हणाले, "दुष्काळी तालुक्यात पाणी आणण्याच्या निवडणूकीत नुसत्या बाता मारल्या गेल्या आता पाणी आणतो म्हणणाऱ्याला तुटवून मारा. त्यानंतर त्यानीच पाणी मागीतले पाहिजे ,कृष्णा खोऱ्यातील पाणी कर्नाटकात वाया जात.  हे पाणी अडवून या भागाला दिले तर दुष्काळी तीव्रता कमी होवू शकेल. पण पाणी आले तर शेतकरी पुन्हा आपले ऐकणार कोण म्हणून पाणी आणण्याची इच्छा होत नाही. साडे चार वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना आश्‍वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यांची आश्‍वासनाची भाषणे ऐकून आता कंटाळा आलाय दुष्काळ जाहीर झाल्यापासून एकही उपाययोजना केल्या नाहीत शासन दुष्काळग्रस्त विदयार्थ्याला परिक्षा शुल्क माफ केल्याचा दावा करत असून यापेक्षा वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करायला पाहिजे."

ते पुढे म्हणाले, "मागील सरकारच्या काळात छावणीत भ्रष्टाचार झाला. पण म्हणून आम्ही चारा दावणीला देण्याची मागणी केली. पण दावणीलाही नाही आणि छावणीत नाही. त्यामुळे जनावरे बाजारात विकण्याची वेळ आली बाजारात घेणाऱ्यांपेक्षा विकणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने जनावरे कमी दरात सुध्दा कोण घ्यायला तयार होईना आणि गोवंश हत्या बंदी कायदयामुळे जनावराचे काय करायचे, हा प्रश्‍न निर्माण झाला. पंतप्रधान मोदी यांनी दौरा आणि जाहीरातीसाठी कोटयावधी रुपये खर्च केले. पण या भागात पाणी आणण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगून निधी दिला जात नाही."

"प्रधानमंत्री फसल विमा योजनेतून अंबानी अदानी यांनी काढलेल्या विमा कंपन्याच शेतकऱ्याला कर्जबाजारी करुन गबर करुन ठेवल्या. त्यामुळे शेतकऱ्याला आता न्याय मिळवायचा, असेल तर संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल.भाजपाला मदत केल्याचा पश्चात्ताप होतो आहे. अच्छे दिन,कर्जमाफी,दीड पट हमी भाव याऐवजी विचित्र कायदे करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले.'' असेही शेट्टी म्हणाले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com