'मन की बात' जाहीर करायची नसते :  अशोक चव्हाण

काही पक्ष 10-12 अशा जागा मागत आहेत. प्रत्येकाला एवढ्या जागा दिल्यास कॉंग्रेसकडे काय उरेल? असा सवाल त्यांनी पत्रकारांनाच केला. योग्य मागणी असेल तर चर्चा करून निर्णय घेता येईल, असे चव्हाण यांनी नमूद केले.
congress abd
congress abd

औरंगाबाद :  " लोकसभेची निवडणूक लढवायची का विधानसभेची? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. 'मन की बात' जाहीर करायची नसते. पक्ष सांगेल तो निर्णय घ्यावा लागेल,"कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी सांगितले. 

" हिंगोली लोकसभा मतदारसंघातून राजीव सातव यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याचे आपल्याला माहीत नाही. मात्र माझ्या शेजारचा मतदारसंघ असल्याने काळजी घेऊ. औरंगाबादेतून अनेक जण तयारी करत आहेत, मला नांदेडकरांनी नाकारलेले नाही, त्यामुळे औरंगाबादमध्ये येण्याचा प्रश्‍नच नाही," असेही श्री. चव्हाण म्हणाले . 

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर श्री. चव्हाण म्हणाले, " सध्या कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू आहे. त्यातून उमेदवारांची पडताळणी केली जात आहे. अद्याप कुठलेही उमेदवार ठरलेले नाहीत. "

शिवसेना आणि एमआयएम पक्ष एकसारखेच आहेत. त्यामुळे एमआयएमसोबच चर्चा करण्याचा प्रश्‍नच नाही, असे श्री. चव्हाण यांनी नमूद केले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com