राज्यातील 4175 अपूर्ण पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण :  लोणीकर 

राज्यातील 4175 अपूर्ण पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण :  लोणीकर 

मुंबई : राज्यातील 4175 अपूर्ण पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वछता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत दिली. 

प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य डॉ. अशोक उईके यांनी करळगाव येथील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, आमदार सत्यजित पाटील यांनी सहभाग घेतला. 

लोणीकर म्हणाले की, "" राज्यभरात उपविभागीय कार्यालयस्तरावर पाणी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या असून ग्रामपंचायतींना पाणी तपासणी बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशिल आहे. करळगाव जि. यवतमाळ येथी पाणीपुरवठा योजनेचे काम 40 टक्के झाले आहे. उर्वरित काम मार्च अखेर पूर्ण करण्यात येईल. राज्यात 4175 पाणी पुरवठ्याच्या योजना अपूर्ण होत्या. त्या संदर्भात विभागीय बैठका घेऊन पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे 5121 गावांना फायदा झाला आहे. तीन वर्षात या कामांसाठी 2749 कोटी रुपये खर्च करण्यात आले.''  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com