बीड : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर असलेल्या पुस्तकाचे फक्त वितरण थांबवून चालणार नाही, तर लेखक, प्रकाशकावर कठोर कारवाई करुन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
एकभाषिक पुरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत सर्व शिक्षा अभियानच्या ‘समर्थ रामदास स्वामी’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल प्रसिद्ध झालेल्या अश्लाघ्य मजकुरामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. या मजकूराबद्दल विविध स्तरांतून अक्षेपही नोंदविण्यात आला. याबद्दल धनंजय मुंडे यांनीही ‘लेखक, प्रकाशक कैफात आहेत का?’ असा सवाल केला होता. दरम्यान, या पुस्तकाचे वितरण थांबविण्याचे निर्देश राज्याच्या शैक्षणिक व संशोधन परिषदेने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
तसेच, शाळांमध्ये वितरण झाले असेल तर पुस्तके मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवावेत असे म्हटले आहे. मात्र, पुस्तकाचे वितरण थांबवून चालणार नाही तर, लेखक, प्रकाशकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.