IAS बांगर-देशमुखांनी SBI ला शुद्धीवर आणले, त्यांचे अभिनंदन! 

IAS बांगर-देशमुखांनी SBI ला शुद्धीवर आणले, त्यांचे अभिनंदन! 

पुणे : शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नागपूर अधिवेशनात सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्याबरोबरच शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यासाठी कडक भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. 

विखे पाटील म्हणले, राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीवरुन शेतकऱ्यांत नाराजी आहे. त्यामुळेच एकाही सत्ताधारी आमदाराने कर्जमाफीचे फलक लावलेले नाहीत. पीककर्जाच्या बाबतीतही शेतकऱ्यांना मदत झालेली नाही. अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यासंदर्भाने कडक भूमिका घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाची एसबीआयमध्ये असलेली खाती त्यांनी बंद केली. राष्ट्रीयकृत बॅंकांना झटका मिळाल्यानंतर पीककर्ज वाटपाला गती आली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी अभिनंदनिय काम केले आहे, असे विखे पाटील म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com