नाना पटोलेंची मोदी सरकारवर टीका

यवतमाळ : यापूर्वी मी शेतकऱ्यांसाठी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तशीच वेळ आली तर खासदारकीही सोडून देईन असा इशारा खासदार नाना पटोले यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी टिटवी येथील प्रकाश मानगावकर या शेतकऱ्याने आत्महत्या केली. यावेळी या शेतकऱ्याने सागाच्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते. सागाच्या पानावर लिहिलेला हा मजकूर प्रकाशित झाला होता. . या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला जाऊन नाना पटोले यांनी भेट दिली. यावेळी खासदार पटोले काय घोषणा करणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु पटोले यांनी कोणतीही महत्त्वपूर्ण घोषणा केली नाही एवढेच नव्हे तर केंद्र व राज्य सरकारवर नेहमीप्रमाणे टीकाही केली नाही. त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com