वसई विरार महापालिकेत अंदाधुंद कारभार

वसई विरार महापालिकेत अंदाधुंद कारभार

मुंबई : नगर नियोजनाची ऐशीतैशी करून बांधकाम क्षेत्रात अंधाधुंदी माजविलेली वसई-विरार महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची असेल. या महानगरपालिकेविषयी प्रचंड प्रमाणात तक्रारी येत असतात. इतक्‍या तक्रारी अन्य कुठल्याही महानगरपालिकेविरोधात येत नाहीत. त्यामुळे या तक्रारींचा निपटारा करताना आमच्याही नाकीनऊ आल्याची भावना मंत्रालयातील अधिका-यांनी "सरकारनामा"शी बोलताना व्यक्त केली. 

या महानगरपालिकेची स्थापना सन 2009 मध्ये झाली आहे. सुमारे 300 चौरस किलो मीटर क्षेत्रफळात ही महानगरपालिका विस्तारलेली आहे. पण सुरूवातीपासूनच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या क्षेत्रावर नियंत्रण ठेवलेले नाही. विशेषतः बांधकाम क्षेत्रात फार मोठी अंधाधुंदी आहे. वसई -विरारमधील जवळपास 90 टक्के इमारती बेकायदा आहेत. सगळे नियम धाब्यावर बसवून या इमारती बांधण्यात आल्या आहेत. इमारती व त्यातील खोल्यांची कागदपत्रे सर्रासपणे बोगस बनविली जातात. अशी कामे करून देण्यात महानगरपालिकेतील कर्मचारीच आघाडीवर आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com