मुंबई : " राजकारण करायचे तर तुमची स्वतःची डोकी वापरा. दैवतांच्या पगड्या वापरू नका,'' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सध्या पगड्यांवरून सुरू असलेल्या प्रतिकात्मक वादावर टीका केली.गोरेगाव येथे शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित शिबिरात उद्धव ठाकरे बोलत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस एकत्र आणला. तुम्ही टोपी,पगडीचे राजकारण करू नका. मराठी माणसांत फूट पाडली तर मराठी माणूस तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही.''
लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले हे दोघेही महापुरुष होते. टिळक आणि फुले त्यांच्या पगड्यांमुळे प्रसिद्ध नाहीत तर त्यांच्या विचारांमुळे प्रसिद्ध आहेत. लोकमान्य टिळक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यातही मतभेद झाले होते पण त्यांनी ते चर्चेने सोडवले या संदर्भातला एक किस्सा यावेळी त्यांनी सांगितला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, " इफ्तार पार्टीच्या टोप्या तुम्हाला चालतात. मग स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या टिळकांची पगडी तुम्हाला का चालत नाही?''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.