यंदा 15 आॅगस्टला देशाला उद्देशून जे काही बोलाल ते खरं बोला : उध्दव ठाकरेंचा मोदींना टोला

मराठी चित्रपटातील नामवंत कलाकर सुबोध भावे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उध्दव ठाकरे यांनी भाषण करत असताना याची घोषणा करत भावे यांचे स्वागत केले.
shivsena-thakrey
shivsena-thakrey

मुंबई : " अच्छे दिनचं स्पप्न दाखवणारे सरकार फक्त बोलघेवडेपणानं कार्यरत आहे. देशातली जनतेला रेशनची काळजी असताना हे सरकार मात्र ‘वन नेशन वन इलेक्शन’च्या प्रयत्नात आहे.   यंदा 15 आॅगस्टला देशाला उद्देशून जे काही बोलाल ते खरं बोला,"अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मार्मिक या साप्ताहिकाच्या 59 व्या वर्धापनदिनी ते बोलत होते. 

देशात व राज्यात सध्या अस्वस्थतेचं वातावरण आहे. असे स्पष्ट करताना ते म्हणाले की," मराठा व धनगर समाज न्याय अधिकारासाठी रस्त्यावर उतरला आहे. हे समाज इतके का आक्रमक झालेत याचे उत्तर सरकारकडे आहे काय ? केवळ आश्वासने देत या सरकारने भ्रमाचा भोपळा तयार केला आहे. याच भ्रमावर सरकारचा बोलघेवडेपणा सुरू आहे  ."

" इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती व त्यानंतरच्या निवडणूकांत इंदिरा गांधीना पर्याय काय असा सवाल केला जात होता. पण देशातल्या जनतेनं पर्याय न पाहता बलशाली इंदिरा गांधीचा पराभव केला. अाताही दुसरी आणीबाणी लादली जातेय की काय अशी स्थिती असून एकदिलानं या आणीबाणीचा पराभव करण्यास पुढे या," असे आवाहनही उध्दव ठाकरे यांनी यावेळी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com