औरंगाबाद कचरामुक्त करण्याचे उध्दव ठाकरे यांचे आदेश

दोन महिन्यापासून शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आजही शहरातील विविध भागात चार टन कचरा पडून आहे. 25 वर्षांपासून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असल्याने कचऱ्याची जबाबदारीदेखील महापालिकेचीच आहे. कचऱ्यावर इतक्‍या वर्षात प्रक्रिया करणारा प्रकल्प का उभारला नाही, असा सवाल देखील शहरवासीयांसह विरोधकांनी केला होता.
औरंगाबाद कचरामुक्त करण्याचे उध्दव ठाकरे यांचे आदेश

औरंगाबाद : अपेक्षेप्रमाणे शहरात दाखल होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कचरा प्रश्नावरून महापौर नंदकुमार घोडले यांच्यासह पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. दहा दिवसात रस्त्यावरील कचरा हटवा अन्यथा मला वेगळा विचार करावा लागेल असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिला. 

दोन महिन्यापासून शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आजही शहरातील विविध भागात चार टन कचरा पडून आहे. 25 वर्षांपासून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असल्याने कचऱ्याची जबाबदारीदेखील महापालिकेचीच आहे. कचऱ्यावर इतक्‍या वर्षात प्रक्रिया करणारा प्रकल्प का उभारला नाही, असा सवाल देखील शहरवासीयांसह विरोधकांनी केला होता. 

कचरा प्रश्नावरून महापालिकेच्या सत्तेत असलेल्या भाजपने अंग काढून घेत शिवसेनेची कोंडी केली होती. महापालिका बरखास्त करण्याची मागणी देखील होऊ लागल्याने उध्दव ठाकरे यांनी ही बाब गांभीर्याने घेतली. विमानतळवर येताच महापौरांना त्यांनी कचऱ्याची परिस्थिती विचारली. त्यानंतर साडेदहा वाजता सुभेदारी विश्रामगृह येथे महापौर, महापालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. दहा दिवसांत शहर कचरामुक्त करा असे आदेश त्यांनी दिले. 30 एप्रिल नंतर मी कुणाला न सांगता शहरात येऊन पाहणी करीन असा दम देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com