यवतमाळ-वाशिममध्ये भाजपच्या तिकिटासाठी दोन 'महाराजां'ची फिल्डिंग

यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) व वाशिम या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत सेनेशी युती झाली नाही तरी भाजपला विजयाची हमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. भावना गवळी या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत.
यवतमाळ-वाशिममध्ये भाजपच्या तिकिटासाठी दोन 'महाराजां'ची फिल्डिंग

वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपकडून दोन महाराजांनी "फिल्डिंग' लावली आहे. एका महाराजांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच भेट घेतल्याने आता स्थानिक भाजपच्या नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) व वाशिम या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत सेनेशी युती झाली नाही तरी भाजपला विजयाची हमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. भावना गवळी या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. 

भाजपकडून निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या अधिक आहेत. यात यवतमाळ येथील प्रेमासाई महाराज व पोहरादेवी येथील कबीरदास महाराज यांचाही समावेश झाला आहे. प्रेमासाई महाराज हे अचानकपणे उगविलेले महाराज आहेत. त्यांच्या भेटीसाठी केंद्रीय मंत्री मनेका गांधी व त्यांचे सुपुत्र खासदार वरुण गांधी थेट यवतमाळमध्ये आले होते. यावरून प्रेमासाई यांची राजकीय पोच सर्वांच्या लक्षात आली. प्रेमासाई महाराज यांनी मतदारसंघात दौरे करणे सुद्धा सुरू केले आहे. प्रेमासाई महाराजांबद्दल स्थानिक भाजपचे नेते मात्र फारसे उत्सुक नसल्याने काहीशी अडचण निर्माण झाली आहे. 

प्रेमासाई महाराजांनी दावा केलेला असताना बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथील कबीरदास महाराज भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्यासोबत कबीरदास महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेतली. संत कबीरदास महाराज यांचा बंजारा समाजावर चांगलाच प्रभाव आहे. भावना गवळी यांना बंजारा समाजाची मते मिळत होती. शिवसेना नेते संजय राठोड यांच्यामुळे ही मते भावना गवळींच्या पदरात पडत होती. गेल्या काही महिन्यांपासून संजय राठोड व भावना गवळींमध्ये मतभेद उफाळून आले. लोकसभा निवडणुकीत संजय राठोड अलिप्त धोरण अवलंबणार असल्याचे बोलले जात आहे. 

सेनेला जाणारी ही मते फोडण्यासाठी कबीरदास महाराजांना राजकारणाच्या फडात उतरविण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघात बंजारा समाजाची मते निर्णायक ठरतात. या राजकीय खेळीमुळे या मतदारसंघात भाजपची या दोन महाराजांवर मदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com