राफेलचे सत्य तळपत्या सूर्यासारखे : मुख्यमंत्री

राफेलचे सत्य तळपत्या सूर्यासारखे : मुख्यमंत्री

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमानांच्या व्यवहारात गैरप्रकार नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. सत्य हे नेहमीच तळपत्या सूर्यासारखे असते, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

``राफेल प्रकरणात कोणत्याही चौकशीची गरज नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आमची (भाजपची) भूमिकाच या निकालातून अधोरेखित झाली आहे. देशाच्या सुरक्षेशी तडजोड केल्याबद्दल आणि भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी केल्याबद्दल आता काँग्रेस पक्ष आणि त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे,`` अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा खोटारडेपणा उघडकीस आला असून, त्यांनी संपूर्ण देशात राफेलबाबत भ्रामक प्रचारतंत्र राबविले. संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घालविला आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान सुद्धा जनतेची दिशाभूल केली. काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची सुद्धा माफी मागितली पाहिजे, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com