इस्लामपूर : "नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून देशात ६०० छोट्या- मोठ्या दंगली झाल्या आहेत. सत्तेवर बसलेलेच वेगवेगळ्या जातीधर्मात तेढ निर्माण करीत आहेत", असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील जाहीर सभेत केला.
आमदार पाटील यांच्या आमदार फंडातील विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, "देशातील जनतेने विकासाच्या नावावर मोदींसाहेबाना मतदान केले, मात्र या जनतेचा भ्रमनिरास झाला. देशात मॉब ब्लिचिंगचे प्रकार वाढतायत. भीमा कोरेगावची दंगल नियोजनबद्ध होती. पोलिसांनी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेय. मोदी सरकार प्रसारमाध्यमावरही दबाव आणत आहे. पोषक बातम्या आणत आहे. सोशल मीडियाच्या टीकेचे केंद्र देशाचे पंतप्रधान ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी एकावेळी केवळ पाचच संदेश पाठविण्याचे वॉट्सअपवर बंधन आणले आहे."
विजय पाटील म्हणाले, "दीडशे कोटींचा निधी आणला म्हणणाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी दीड दमडी तरी आणली का? त्यांनी अपघाताने मिळालेल्या सत्तेचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी करावा. मैदानाची भाषा करणाऱ्याची उंची साहेबांच्या गुडघ्याएवढी तरी आहे का?" अँड. चिमण डांगे म्हणाले, "सत्ताधारी कोणतेही काम न करता मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करीत आहेत."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.