`मेट्रो आम्ही आणली म्हणणारे ठाण्याचे नेते आहेत तरी कोण ?'

कोणी कितीही बोटीवरून बसून पाहणी दौरे केले, तरी जलवाहतुकीचे संपूर्ण श्रेय हे भाजपलाच जाते, असा टोला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला अप्रत्यक्षरीत्या टोला मारला. त्यामुळे पुन्हा युतीमधील राजकीय कलगीतुरा समोर आला आहे.
`मेट्रो आम्ही आणली म्हणणारे ठाण्याचे नेते आहेत तरी कोण ?'

डोंबिवली : कोणी कितीही बोटीवरून बसून पाहणी दौरे केले, तरी जलवाहतुकीचे संपूर्ण श्रेय हे भाजपलाच जाते, असा टोला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला अप्रत्यक्षरीत्या टोला मारला. त्यामुळे पुन्हा युतीमधील राजकीय कलगीतुरा समोर आला आहे.
 
कल्याण-डोंबिवली पत्रकार संघातर्फे डोंबिवली पूर्वेकडील बालभवन सभागृह येथे नुकताच "दिलखुलास संवाद' हा कार्यक्रम झाला. या वेळी विविध नागरी आणि विकासाच्या प्रश्‍नांना चव्हाण यांनी उत्तरे दिली. 

या वेळी जलवाहतुकीबाबत आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले, की जलवाहतुकीची जनक भाजपच आहे. जलवाहतूक सुरू होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अत्यंत सकारात्मक असून त्यांनी प्राधान्याने या संकल्पनेला हिरवा कंदील दाखवला आहे. केवळ त्यांच्यामुळेच ठाणे जिल्ह्यातील जलवाहतुकीचे प्रकल्प येत्या कालावधीत पूर्णत्वास जाणार आहेत. त्यामुळे कोणी कितीही बोटीतून फिरले, तरी बोटीचे खरे मालक आम्हीच आहोत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एमएमआरडीएचे अध्यक्ष असल्याने त्यांनी ठाणे, नवी मुंबई, पनवेल ते कल्याणपर्यंतच्या भागात मेट्रोचे जाळे निर्माण करणारे निर्णय घेतले. एमएमआरडीएच्या प्रकल्पात आमदार, खासदार यांना ढवळाढवळ करता येत नाही. तो अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळे मेट्रो आम्ही आणली म्हणणारे ठाण्याचे नेते आहेत तरी कोण, असा टोलाही त्यांनी मित्रपक्षाला लगावला. 

दरम्यान, या कार्यक्रमास चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी चव्हाण यादेखील उपस्थित होत्या. शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारावी, अशी अपेक्षा त्यांनी एक डोंबिवलीकर म्हणून राज्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्याने सभागृहात एकच हशा पिकला. 

महापालिकेत राहूनच 27 गावांचा विकास शक्‍य 
महापालिकेत राहूनच 27 गावांचा विकास होऊ शकतो. आज या भागात मूलभूत सोई-सुविधांच्या काही समस्या असल्या, तरी त्या सोडवण्याला प्राधान्य दिले जात आहे. सरकारच्या मदतीने रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना आखण्यात आल्या आहेत. त्यामुळे 27 गावांतही महापालिकेच्या माध्यमातून चांगल्या सोई-सुविधा नजीकच्या काळात मिळतील, असा विश्‍वास चव्हाण यांनी व्यक्त केला. 

केडीएमसी निवडणुकीवेळी या गावांची स्वतंत्र नगरपालिका झाली पाहिजे, अशी भूमिका घेत भाजपने मतांचा जोगवा आपल्या पदरात पाडून घेतला होता; मात्र आता चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे भाजपचा दुटप्पीपणा समोर आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com