महाराष्ट्रात राष्ट्रीय पक्षांची मस्ती चालू देणार नाही - उद्धव ठाकरे

 महाराष्ट्रात राष्ट्रीय पक्षांची मस्ती चालू देणार नाही - उद्धव ठाकरे

पंढरपूर : देशात ज्या पाच राज्यात निवडणुका झाल्या त्यापैकी मिझोराम आणि तेलंगणा या दोन राज्यात राष्ट्रीय पक्षांना पूर्णपणे नाकारण्यात आले, या दोन राज्यातील जनतेने राष्ट्रीय पक्षांची मस्ती आम्ही चालू देणार नाही हाच संदेश दिला आहे, तोच संदेश आपल्या शिवरायाच्या महाराष्ट्राने द्यायला हवा असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये केले. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांनी अनेक प्रश्‍नांना हात घातला. 

भाषणाची सुरवात करताना त्यांनी नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांचा संदर्भ दिला. ते म्हणाले या पाच राज्यात तोंड दाखवायला जागा राहिली नाही असा दणका भारतीय जनता पक्षाला तिथल्या जनतेने दिला आहे. भाजपचा या पाच राज्यात सुपडा साफ झाला असून त्यांच्या ठिकऱ्या उडवल्या आहेत. मी पंढरपूर नंतर आता वाराणसीला जाणार अशाही बातम्या दिल्या गेल्या, मी जाईनही तिथे, देशभरात मी कुठेही जाईन. पण मी तुम्हाला सांगतो मी अयोध्येत गेलो तो कुंभकर्णाला जागे करण्यासाठी, अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी आमची बांधिलकी कायम आहे, अयोध्येत राममंदिर उभारणारच. राफेल विमानाच्या व्यवहाराचा उल्लेख करून त्यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. पहारेकरीच चोर असल्याचा आरोप करून त्यांनी राफेलच्या मुद्यावर भाजपवर घणाघाती टीका केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com