शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातू 70 जागा लढविणार : अनिल घनवट

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी सन २००१ मधे टास्क फोर्सच्या माध्यमातून भारत उत्थान कार्यक्रम दिला आहे. सदर कार्यक्रम लागू करण्यास तयार असलेल्यांनाच पाठींबा देऊन त्यांना सरकार स्थापन करण्यास मदत करणार.-अनिल घनवट
Ghanwat shetkari sangh
Ghanwat shetkari sangh

हिंगोली :  आगामी विधानसभा निवडणुका शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून सत्तर जागा लढविणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी शुक्रवारी (ता.२८)  बोलतांना दिली आहे. 

यावेळी बोलतांना श्री. घनवट म्हणाले की," आगामी निवडणुका कृषी धोरणावर होणे आवश्यक आहे. शेतीमालास भाव नाही, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही. शेती उत्पादन वाढल्यानंतर निर्यातबंदी करायची अन उत्पादन कमी झाल्यानंतर परदेशातून शेतीमाल आयात करून भाव पाडायचे अशीच भूमिका  आतापर्यंतच्या सरकारने  घेतली आहे . "

" राज्यातील निवडणुकांमधे जाती व धर्माच्या नावावर मतांचे ध्रुवीकरण झाले आहे. मात्र आता अर्थवादाच्या मुद्यावर मतांचे ध्रुवीकरण झाले पाहिजे अशी आमची भूमिका  आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून सत्तर जागा लढविणार आहे. यावेळी त्रिशंकू स्थिती राहिल्यास समाजवादी धोरणे राबविणाऱ्याच्या  पाठीशी शेतकरी संघटना उभी राहणार आहे." असे  श्री. घनवट यांनी स्पष्ट केले. 

यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश पदाधिकारी गीता खांदेभराड, सतीश दाणी, अनिल चव्‍हाण, सीमाताई  नरोडे, ब.ल. तामसकर, उत्तमराव वाबळे, गोरख पाटील आदी उपस्‍थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com