अनंत गीते निष्क्रीय मंत्री, सुनील तटकरेंचा हल्लाबोल 

अनंत गीते निष्क्रीय मंत्री, सुनील तटकरेंचा हल्लाबोल 

पेण : केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हे आतापर्यंतचे सर्वांत निष्क्रीय मंत्री असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील तटकरे यांनी शनिवारी पेण येथे केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार सोहळा आणि कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती, या वेळी तटकरे बोलत होते. ते म्हणाले, की गीते यांनी गेल्या निवडणुकीत दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ असे आश्‍वासन दिले होते; मात्र आजपर्यंत एकाही युवकाला नोकरी दिली नाही. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत एखादा नवीन कारखानाही त्यांना आणता आला नाही. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद व्यर्थ आहे. 

सरकारचे जनतेला फसवण्याचे काम 
तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी 2004 मध्ये भारताला 1550 रुपये प्रतिक्विंटल दर दिला होता; मात्र आजची परिस्थिती काय आहे याचा विचार शेतकरीवर्गाने करावा. मुंबई-गोवा महामार्गाचे कामदेखील अर्धवट आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. तसेच प्रत्येकाच्या बॅंक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्‍वासन दिले. यातून केवळ जनतेला फसवण्याचे काम सरकार करत असल्याचा दावा तटकरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com