"तुमच्या काळातलं काही बोललं की म्हणता का काढता? तुम्ही मात्र आमचं सगळं काढता' 

"तुमच्या काळातलं काही बोललं की म्हणता का काढता? तुम्ही मात्र आमचं सगळं काढता' 

मुंबई : "" तुमच्या काळातलं काही बोललं मागचं का काढता म्हणता अन्‌ आमचं मात्र सगळं काढता,'' असे मंत्री सुभाष देशमुख सुनावताच बसल्या जागेवरूनच अजित पवार म्हणाले, " आम्ही काढणारच ! तुम्ही सरकारमध्ये आहात त्यामुळे आम्ही बोलणारच !'' विधानसभेत या दोघांमध्ये आज कलगितुरा चांगलाच रंगला. 

विरोधी पक्षाच्यावतीने नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना देशमुख बोलत होते. ते म्हणाले, "" राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांमध्ये पात्र अपात्र शेतकरी कोण हे आपण ठरवले आहेत. निकषानुसार ऑनलाईन 77 हजार 29 हजार शेतकऱ्यांनी फॉंर्म भरले आहेत. शेतकऱ्यांचे कौतुकच आहे. शेतकऱ्यांनी भरलेली माहिती बॅंकेला न देता बॅंकेकडून यादी मागून घेतली. पहिल्या यादीनुसार 55 लाख शेतकऱ्यांची यादी बॅंककडे दिली आहे. 46 लाख 52 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत.'' 

माझ्या माहितीनुसार 2008 ची कर्जमाफी ही व निवडणुक डोळ्यासमोर ठेवून केली होती. मात्र, आम्ही कर्जमाफी शेतकरी डोळ्यासमोर ठेवून केली आहे. 35 लाख शेतकऱ्यांच्या 13 हजार कोटी रूपये आतापर्यंत जमा केले शेतकऱ्यांच्या यादीची सिडीच्या स्वरूपात पटलावर ठेवण्यात येईल. तुमच्या काळातलं काहीही बोललं मागचं का काढता म्हणता अन्‌ आमचं मात्र सगळं काढता असे देशमुख यांनी म्हणताच अजितदादांनीही त्यांना उत्तर दिले. 

त्यावर पलटवार करत देशमुख म्हणाले, " तुम्ही बोला पण, आम्हीच शेतकऱ्यांना न्याय देणार. शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न आम्ही सोडवणारच ! 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com