फेरीवाल्यांच्या मुजोरपणा थांबवा  सुभाष देसाईंची अधिकाऱ्यांना तंबी 

फेरीवाल्यांच्या मुजोरपणा थांबवा  सुभाष देसाईंची अधिकाऱ्यांना तंबी 

मुंबई : बोरिवली-मागाठणे परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या फेरीवाल्यांमुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरू झाल्याने त्यात आणखी भर पडली आहे. फेरीवाल्यांच्या या मुजोरपणासह अन्य मुद्यांवर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

मुंबईत पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबत आहे. महानगरपालिका शिवसेनेकडे असून अर्थातच सगळी जबाबदारी याच पक्षाकडे येते. मुंबईकरांच्या प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. बोरिवली-मागाठणे सह अनेक तक्रारी आमच्या पर्यंत पोहचत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी आज मनपा व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे सुभाष देसाई यांनी 'सरकारनामा' शी बोलताना सांगितले. 

बोरिवली मागाठणे परिसरात मोठया प्रमाणात फेरीवाले असल्याने स्थानिक नागरीकांची खूप अडचण होत आहे. फेरीवाल्यांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने सगळीकडे चिखल पसरला असून नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी फेरीवाल्यांच्या मुजोरी संदर्भात सुभाष देसाई यांना माहिती दिली होती. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा आग्रह केला होता. या पार्श्वभूमीवर देसाई यांनी सदर भागातील फेरीवाल्यांना हटविण्याची तंबी मनपा अधिकाऱ्यांना दिली.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com