अजित पवारांना त्रास देण्याचा उद्देश : भुजबळ

अजित पवारांना त्रास देण्याचा उद्देश : भुजबळ

पुणे : ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचा उल्लेख असलेले प्रतिज्ञापत्र सादर करून राजकीय खेळी केली आहे, अशी टीका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुण्यात केली.

सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू असताना आता निवडणुकीच्या तोंडावर हा विषय राज्य सरकारने उकरून काढल्याचे भूमिका भुजबळ यांनी मांडली आहे. यामागे केवळ त्रास देण्याच्या उद्देश असून जाणीवपूर्वक राज्य सरकारने ही खेळी केल्याची टीका त्यांनी केली. 

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते समता पुरस्कार देण्यात आला. यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी मराठा आरक्षणाबाबत त्यांनी आज पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.
 
पुण्यातील समता भूमी राष्ट्रीय स्मारक व्हावे, ही सुरवातीपासूनची मागणी आहे. अनेक वर्षापासून हे काम रखडले आहे. त्यासाठी सुरवातीपासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. मात्र सध्याचे राज्य सरकार सकारात्मक प्रतिसाद देत नाही. वास्तविक स्मारकासाठी कोट्यवधींचा खर्च नाही. काही लाखांचा प्रश्‍न आहे. मात्र राज्य सरकार पावले उचलत नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com