...तर मुख्यमंत्र्यांना आठवेल विठ्ठल - बच्चू कडू

कर्जमाफी ही मलमपट्टी असून शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. त्यासाठी शेतकरी पेटला पाहिजे, तरच आंदोलनाला धार येणार आहे. पंढरीला जाणारा वारकरी जेव्हा मंत्रालयावर धडकेल; तेव्हाच मुख्यमंत्र्यांना पांडुरंग आठवेल, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.
...तर मुख्यमंत्र्यांना आठवेल विठ्ठल - बच्चू कडू

भोसे (पंढरपूर) - कर्जमाफी ही मलमपट्टी असून शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. त्यासाठी शेतकरी पेटला पाहिजे, तरच आंदोलनाला धार येणार आहे. पंढरीला जाणारा वारकरी जेव्हा मंत्रालयावर धडकेल; तेव्हाच मुख्यमंत्र्यांना पांडुरंग आठवेल, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.

आमदार कडू आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कडू म्हणाले, ""कर्जमाफीचा निर्णय हा संभ्रम करणारा असल्याने सुकाणू समितीने तो मान्य केलेला नाही. त्यासाठी 10 जुलैपासून राज्यभर जनजागरण यात्रा काढणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांसमोर शासन निर्णयाची पोलखोल करणार आहे. संतांचे कार्य हे पांडुरंगापुरते मर्यादित नसून ते शेतकऱ्यांपर्यंत आहे. संत तुकाराम महाराज यांनी पहिल्यांदा कर्जमाफी केली होती. असे सांगून मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा करण्यापासून रोखू नका; निदान पूजेनंतर तरी पांडुरंग त्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची सद्‌बुद्धी देईल, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com