नाशिक ः पंतप्रधान नरेंद्र मोदीनी राबविलेला विकासाचा अजेंडा थोपवता येत नाही. त्यामुळे विरोधक संविधान बदलाच्या चर्चा पुढे करतात. मोदींना संविधान बदलायचे नाही. कोणीही संविधान बदलू शकत नाही असा दावा करतानाच युती करायची की नाही, हे शिवसेनेवर अवलंबून असेल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी आज येथे दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच संविधान बदलाच्या हलाचाली सुरू असल्याची टीका केली होती. यासंदर्भात दानवे यांनी स्पष्टीकरण दिले. शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल याचा पुनरुच्चार केला होता.
त्याबाबत दानवे म्हणाले, ""आगामी निवडणुका शिवसेना, भाजपने एकत्र लढवाव्यात अशी आमची इच्छा आहे. याविषयी वेळोवेळी तसे संकेत दिले आहेत. मात्र युती करायची की नाही, हे शिवसेनेवर अवलंबून असेल. असे सांगुन त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना- भाजप युतीचा चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात भिरकावला आह. मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनानंतर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, दिलीप गांधी, रक्षा खडसे यांसह शहरातील आमदार व पदाधिकारी होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.