आढळराव म्हणतात मी सेनेचे चार आमदार निवडून आणणार!

आढळराव म्हणतात मी सेनेचे चार आमदार निवडून आणणार!

राजगुरूनगर : शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आक्रमक भाषण करत आपल्या मतदारसंघात आपण चांगले काम करत असल्याचा दावा केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे चार आमदार निवडून आणणार आणि सेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजगुरूनगर येथे झालेल्या सभेत आढळराव यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. ते म्हणाले, भाजपचे मंत्री हे राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त मदत करतात. मंत्र्यांना भेटल्याचे फोटो हे आमदार मतदारसंघात फिरवतात आणि दुसरीकडे याच सरकारच्या विरोधात हल्लाबोल करतात. राष्ट्रवादीच्या आमदारांपेक्षा कमी सहकार्य हे सेनेच्या आमदारांना केले जाते.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. हडपसरमध्ये पक्षाचा आमदार होता. तेथे परिस्थिती चांगली आहे. खेड मतदारसंघाने मला नेहमी मतांची आघाडी दिली. येथे सेनेचा आमदार आहे. जुन्नरमध्ये सेनेचा आमदार होता. तेथेही आमदार होईल. आता अनेक ग्रामपंचायती या सेनेच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगल्या जागा मिळतील.

ते म्हणाले की पुणे- नाशिक रेल्वे होणार म्हणजे होणारच. तसेच राजगुरूनगर- नाशिकफाटा , तळेगाव- शिक्रापूर हे महामार्गही होणार. पुढच्या वेळेला शतप्रतिशत सेनेचे सरकार राज्यात येणार.

आढळराव हे स्वतः निवडून येतात. पण ते आमदार किंवा इतर लोकप्रतिनिधी पक्षाच्या चिन्हावर निवडून आणत नाहीत, अशी त्यांच्यावर टीका केली जाते. या टिकेला त्यांनी या सभेच्या निमित्ताने उत्तर दिल्याची चर्चा होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com