सरकारचे 'त्यांच्या' रस्त्यांकडे लक्ष नाही महापौरांचा चंद्रकांत दादांना टोला 

सरकारच्या अखत्यारितील रस्त्यांकडे सरकारचे लक्ष नाही. एमएमआरडी, विमानतळ प्राधिकरण, बीपीटी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी प्राधिकरणांचे मुंबईत रस्ते आहेत.
सरकारचे 'त्यांच्या' रस्त्यांकडे लक्ष नाही महापौरांचा चंद्रकांत दादांना टोला 

मुंबई: " आम्ही आमच्या रस्त्यांची काळजी घेत आहोत. मात्र सरकारचे त्याच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांकडे लक्ष नाही," अशा शब्दात महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी सरकारला लक्ष करीत बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर निशाणा  साधला आहे. 

उद्या मेट्रोच्या कामांमुळे मुंबई तुंबल्यास राज्य सरकार जबाबदार राहिल, अशी थेट टीका महापौर महाडेश्‍वर यांनी केली होती. त्याबाबत महापौरांनी प्रसार माध्यमांसमोर शब्द फिरविले. आपण वस्तूस्थिती मांडली होती, मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा आपला उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण देत महापौरांनी सारवासारव केली.

मुंबईत गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई जलमय झाली. रस्ते आणि उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली. पाऊस आणि वाहतूकीचा प्रचंड ताण यामुळे मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली. त्याबाबत महापौरांनी पुन्हा सरकारला लक्ष केले. चंद्रकांतदादांनी मुंबईच्या खड्ड्यांची जबादारी महापालिकेवर झटकली होती . 

त्यावर प्रतिहल्ला चढवताना महापौर महाडिक म्हणाले ,"सरकारच्या अखत्यारितील रस्त्यांकडे सरकारचे लक्ष नाही. एमएमआरडी, विमानतळ प्राधिकरण, बीपीटी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी प्राधिकरणांचे मुंबईत रस्ते आहेत. आम्ही आमच्या पालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांची काळजी घेत आहोत. मात्र सरकार त्यांच्या अखत्यारितील रस्त्यांची काळजी घेत नाहीत. "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com