नगर : "आंदोलनादरम्यान युवकांनी शांतता राखा. कुठलेही नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. भावनेच्या भरात आपला तोल जावू देऊ नका. सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. पण त्यांना दिसेल मराठ्यांची ताकद. कार्यकर्त्यांनी संयम राखा,'' असे आवाहन शिवसेनेचे स्थानिक नेते संभाजी कदम यांनी केले.
आज सकाळी माळीवाडा बसस्थानकाजवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते पुष्पहार घालून आंदोलनाच सुरूवात करण्यात आली. हजारो युवक असलेली मोटारसायकल महारॅलीची सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली गेली. जाताना दुकानदारांना बंदचे आवाहन करण्यात आले. दिल्ली गेट येथे रॅलीचा समारोप सकाळी अकरा वाजता करण्यात आला. तेथे कार्यकर्त्यांची भाषणे होऊन शांततेचे आवाहन करण्यात आले.
दिल्ली गेट येथे प्रचंड गर्दीतून पुण्याकडे जाण्यासाठी रुग्णवाहिका आली होती. त्या वेळी युवकांनी तातडीने कडी तयार करून रुग्णवाहिकेला रास्ता मोकळा करून दिला. असेच सहकार्य युवकांनी करावे, असे आवाहन या वेळी नेत्यांनी केले.
श्रीगोंदे येथे निमगाव खलू येथे रास्ता रोको सुरू झाला. संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. राहुरी, कर्जत, पारनेर तालुक्यातील सर्वपक्षीय कडकडीत बंद करण्यात आला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.