कर्जमाफी आंदोलनातील सहभागी शेतकऱयांवरील  गुन्हे मागे घ्या - शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

SHIVSENA
SHIVSENA

मुंबई   : शेतकरी कर्जमाफी विरोधात राज्यातील शेतकऱयांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.या शेतकरी आंदोलकावर कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न करून पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मात्र हे गुन्हे राजकीय स्वरूपाचे आहेत. हे गुन्हे सरकारने मागे घ्यावेत,यासाठी शिवसेनेचे मंत्री आमदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साकडे घातले आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱयांनी त्यांना कर्जमाफी मिळण्याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने केली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरूद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यत आले आहेत. शेतकरी कर्जमाफीसाठीचे आंदोलन तिव्र झाल्याने सरकारला नमते घ्यावे लागले.यानंतर सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 जाहीर करण्यात आली.त्यामुळे आंदोलना दरम्यान शेतकर्यावर दाखल झालेले  गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे,आमदार सुनील प्रभू आदींच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com