मुंबई : नाणार प्रकल्पावरून केंद्र सरकारने शिवसेनेची कोंडी केली असताना आता अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कमी केल्याने शिवसेनेत संतापाचे वातावरण आहे. हे दोन्ही मुद्दे शिवसेनेसाठी प्रतिष्ठा व अस्मितेचे असल्याने उद्या संसदेत केंद्र सरकार विरोधातील अविश्वास ठरावावर शिवसेना निर्णायक भूमिका घेण्याचे संकेत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगविख्यात पुर्णाकृती पुतळा अरबी समुद्रात उभारला जाणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने छत्रपतींच्या पुतळ्याची उंची तब्बल 26 मिटरनं कमी केली आहे. त्याचे तीव्र पडसाद शिवसेनेत उमटले आहेत. शिवसेनेला विश्वासात न घेता नाणार प्रकल्पाचा करार केंद्र सरकारने केला. शिवसेनेचा विरोध असल्याने नाणारवासियांनी केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेनं मतदान करावे. अन्यथा नाणार मधे पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
त्यातच आता केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याची कागदपत्रे समोर आली आहेत. यावरून शिवसेनेत प्रचंड संतापाचे वातावरण आहे. अशा स्थितीत शिवसेनेनं अविश्वास ठरावातून माघार घेत मतदानाला दांडी मारली तरी राजकीय कोंडी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे शिवसेना यावेळी निर्णायक होवू शकते, असे काही सेना नेत्यांचे मत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.