रिझर्व बॅंकेसमोर अरुंधती भट्टाचार्य यांच्या पुतळ्याचे दहन

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर बॅंकांची आर्थिक स्थिती बिघडते, असा युक्तीवाद करणाऱ्या स्टेट बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक अरुंधती भट्टाचार्य यांनी उद्योजकांना कर्जमाफी कशी दिली- राजू शेट्टी
Shetkari Aandolan
Shetkari Aandolan

नागपूर - स्वाभिमाना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज नागपुरातील संविधान चौकात असलेल्या रिझर्व बॅंकेच्या समोर स्टेट बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक अरुंधती भट्टाचार्य यांच्या पुतळ्याचे दहन केले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी विदर्भातील विविध ठिकाणी अनेक संघटनांनी रविवारी अन्नत्याग आंदोलन केले होते. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी खासदार शेट्टी आले होते. मुंबईला परत जाताना त्यांनी नागपुरात अरुंधती भट्टाचार्य यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रवी तुपकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. "शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे', अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

उद्योजकांची कर्जमाफी कशी होते?
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर बॅंकांची आर्थिक स्थिती बिघडते, असा युक्तीवाद करणाऱ्या स्टेट बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक अरुंधती भट्टाचार्य यांनी उद्योजकांना कर्जमाफी कशी दिली, असा सवाल स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखी असल्याने शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते, या आश्‍वासनाची पूर्तता करावी, असेही खासदार शेट्टी यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com