मोदींच्या एकाधिकारशाहीला जनताच सुरुंग लावणार!

झालेले हाल शेतकरी विसरलेले नाहीत
मोदींच्या एकाधिकारशाहीला जनताच सुरुंग लावणार!

नगर : जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळविली. पण सत्तेत आल्यानंतर पंतप्रधानपदाचा मान ठेवला नाही. लोकशाहीत जनताच सर्वकाही ठरवित असते. या निवडणुकीत मोदींच्या एकाधिकारशाहीला जनताच सुरुंग लावणार आहे, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे आयोजित सभेत पवार यांनी सरकारवर सडाडून टीका केली. ते म्हणाले, नेहरुंनी काय केले, असे विचारणारे मोदी माझ्यावर टीका करतात, मात्र त्यांनी गेल्या पाच वर्षांत काय केले, हे सांगत नाहीत. शेतकऱ्यांचे हाल केले, उद्योगधंदे बंद पाडले, हे ते सांगत नाही. माझ्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी विकास कामांबाबत बोलावे. आता जनतेला सर्व काही कळते. गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांचे झालेले हाल शेतकरी विसरलेले नाहीत. त्यामुळे जनताच या सरकारला त्यांची जागा दाखवून देणार आहे.

मोदींची खोटी आश्वासने म्हणजे लबाडाघरचे आवतान आहे. ते आता जेवूच नका. यापूर्वी फसलात आता फसू नका. सत्ताधारी अनेक आश्वासने देतील, परंतु त्या आश्वानांना भुलू नका. यापूर्वीचा इतिहास लक्षात घ्या. कोणतेच कामे त्यांनी केले नाहीत, उलट नोटाबंदी, जीएसटीच्या माध्यमातून उद्योगधंदे बंद केले. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना रांगेत उभे केले. आता लबाडाच्या गप्पांना भुलू नका, असे आवाहन पवार यांनी केले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com