राज्य प्रशासनात या वर्षी  महत्त्वाचे  फेरबदल  होणार

आयएएसची मंजूर पदे- 361उपलब्ध अधिकारी-252थेट आयएएसची रिक्त पदे-36पदोन्नती मिळालेले अधिकारी-19
mantralya-
mantralya-

मुंबई :  राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे डॉ. भगवान सहाय यांच्यासह आठ सनदी अधिकारी या वर्षी सेवानिवृत्त होत अहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्य प्रशासनात लवकरच मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. 

सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. एस. संधू, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, कृषी विभागाचे बिजयुकमार, शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या संचालक मालिनी विजय शंकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संजय देशमुख, तसेच आदिवासी विकास आयुक्त आर. जी. कुलकर्णी, अरुण शिंदे या अधिकाऱ्यांची सेवा 2018मध्ये संपणार आहे. 
  
राज्याचे वाढते नागरीकरण, नव्याने उभ्या राहणाया व्यावस्था आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेले पायाभूत पकल्प लक्षात घेता महाराष्ट्राला दरवर्षी 15 आयएएस अधिकारी द्यावेत, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. सध्या राज्याला दरवर्षी आठ आयएएस अधिकारी मिळतात. यासंदर्भात उद्या (गुरुवार) केंद्रीय कार्मिक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होत आहे. या बैठकीला सुमीत मल्लिक, सामान्या प्रशासन विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर उपस्थित राहणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com