खंजीर खुपसणारे आता घरी येतो म्हणत्यात;  सतेज पाटील यांचा महाडिकांना टोला

गेल्या लोकसभा निवडणूकीत ज्यांनी पाठित खंजीर खुपसला, ज्यांनी कॉंग्रेस संपविण्याचे काम केले तेच आता घरी येतो म्हणतात, पण ज्यांनी आमचा विश्‍वास घात केला आता त्यांना मदत करायची नाही, असा आमचा आणि कार्यकर्त्यांचा निर्णय झाला असल्याचे सांगत खंजीर खुपसणाऱ्याला मदत करायची का? असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला. यावर उपस्थितांनी एकमताने नकार दिला.
खंजीर खुपसणारे आता घरी येतो म्हणत्यात;  सतेज पाटील यांचा महाडिकांना टोला

कोल्हापूर : गेल्या लोकसभा निवडणूकीत ज्यांनी पाठित खंजीर खुपसला, ज्यांनी कॉंग्रेस संपविण्याचे काम केले तेच आता घरी येतो म्हणतात, पण ज्यांनी आमचा विश्‍वास घात केला आता त्यांना मदत करायची नाही, असा आमचा आणि कार्यकर्त्यांचा निर्णय झाला असल्याचे सांगत खंजीर खुपसणाऱ्याला मदत करायची का? असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला. यावर उपस्थितांनी एकमताने नकार दिला. 

कोल्हापूर शहर जिल्हा युवक कॉंग्रेसच्यावतीने आयोजित परीवर्तन अभियानाचा सांगता समारंभ जवाहरनगर येथे झाला. यावेळी ते बोलत होते. 

आमदार पाटील म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणूकीत पक्षाचा दबाव होता. त्यामुळे निर्णय घेतला. निवडणूका लागल्यानंतर लोक आता घरी येतो म्हणून लागल्यात. आता म्हणतात घरी येतो. भेट घेतो. गेल्यावेळी सुध्दा असेच झाले. ज्यांनी आमचा विश्‍वास घात केला त्यांना मदत करायची नाही, हा निर्णय पक्का आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा कोणत्याही कार्यकर्ता विश्‍वास घातकी लोकांना मदत करणार नाही असा टोलही खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता लगावला. 

श्री. पाटील म्हणाले, विधानसभा निवडणूकीची आम्हाला काहीही अडचण येणार नाही. सर्वच निश्‍चितपणे एकत्र काम करणार आहोत. यामध्ये कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे असतील. या सर्व मंडळीने आपआपल्या ताकदीने कॉंग्रेस पक्षाचे आमदार निवडूण आणण्याचे काम केले जाणार आहे. मोदी लाट असतानाही 2014-15 मध्ये महानगरपालिकेत 29 नगरसेवक कॉंग्रेसचे निवडूण आले आहेत. तो वारसा पुढे घेवून जाण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. काही चुका आमच्याही असतील. पण विधानसभेला या चुका होणार नाहीत. तुम्ही लातूर, उस्मानाबादहून आमदार घेवून येणार आहोत, तसेच कोल्हापूरातुन किमान 6 आमदार घेवून आल्याशिवाय गप्प बसणार नाही. पश्‍चिम महाराष्ट्राने कॉंग्रेसला ताकद दिली आहे. आता नव्याने ही ताकद उभी राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, धीरज देशमुख उपस्थित होते. 

पी.एन.पाटील, प्रकाश आवडे, जयवंतराव आवळेंसह आम्ही सर्व जण एकसंघपणे काम करणार आहोत. जिल्ह्यातून कॉंग्रेसचे किमान 6 आमदार घेवूनच विधानसभेत येणार आहे. प्रत्येकजण आपआपल्या मतदार संघात जीवओतून काम करणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com