रडायचं नाही तर शेतकऱ्यांसाठी लढायचं : सदाभाऊ खाेत

"संघटनेशी प्रामाणीक राहुन गेली 30 वर्ष शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढलो सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत त्यांना न्याय मिळवून देण्याचीच भुमिका घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रेम, पाठबळ वाढत गेले. मात्र, माझे वाढते प्रस्थ अनेकांच्या डोळ्यात खुपत होते. सदाभाऊ मोठा झाला नाही पाहिजे, या इर्षेनेच काही जणांनी कटकारस्थान करून मला संघटनेतून बाहेर काढले. पण मी हरलो नाही. रडायचं नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढायचे या जिद्दीनेच मी काम करतोय," असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
रडायचं नाही तर शेतकऱ्यांसाठी लढायचं : सदाभाऊ खाेत

अकोला : "संघटनेशी प्रामाणीक राहुन गेली 30 वर्ष शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढलो सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत त्यांना न्याय मिळवून देण्याचीच भुमिका घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रेम, पाठबळ वाढत गेले. मात्र, माझे वाढते प्रस्थ अनेकांच्या डोळ्यात खुपत होते. सदाभाऊ मोठा झाला नाही पाहिजे, या इर्षेनेच काही जणांनी कटकारस्थान करून मला संघटनेतून बाहेर काढले. पण मी हरलो नाही. रडायचं नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढायचे या जिद्दीनेच मी काम करतोय," असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, "निसर्गाच्या अवकृपेमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकऱ्यांची दयनिय अवस्था झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या नावावर काही जण केवळ राजकारण करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असून सरकारची शेतकऱ्यांना न्याय देण्याचीच भुमिका राहिली आहे. मात्र, विरोधकांकडून अपप्रचार करून सरकारविषयी संभ्रम निर्माण करण्यात येत आहे."

"मी गेल्या 30 वर्षांपासून संघटनेशी प्रामाणिक राहुन शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी लढतोय. त्यामुळेच आमदारकी आणि कृषी राज्यमंत्री पद मिळाले. मंत्री पद मिळाल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, शेतकऱ्यांसाठी मी काही तरी चांगले करतोय या भितीनेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही जणांनी कटकारस्थान रचून मला संघटनेतून काढले. मात्र, माझ्यावर झालेल्या आघातामुळे खचून न जाता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेला लढा नव्या दमाने सुरू केला. रयत क्रांती संघटनेची स्थापना करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे," असेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

सदाभाऊ पुढे म्हणाले, "विदर्भातील कापूस, सोयाबीन, धान उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. ते संघटना आणि शासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. गावगाड्यातील लोकांचा प्रश्न, त्यांचे दुखः मी जाणत असून ते सोडवत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रयत क्रांती संघटना काम करते आहे. शेतकरी, युवावर्गाला संघटीत करून त्यांना प्रश्न सोडविण्यासाठी उभे करायते आहे, भावनेवर नाही. त्यादृष्टीनेच विदर्भासह महाराष्ट्रात रयत क्रांती संघटनेचे जाळे अधिक मजबुत करण्याचा प्रयत्न सुरू आहे," आता प्रत्येक जिल्ह्यात सभा, बैठका घेण्यात येत असून शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सदाभाऊ म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com