भाजपचे नेते 7 डिसेंबरला बॅगा घेऊन राज्याबाहेर निघून जातील - सचिन पायलट

भाजपचे नेते 7 डिसेंबरला बॅगा घेऊन राज्याबाहेर निघून जातील - सचिन पायलट

उदयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची लढाई आता टिपेला गेली आहे. कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे युद्ध जोरात सुरू आहे. कॉंग्रेसचे तरुण नेते व मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य दावेदार सचिन पायलट यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, राजस्थानमध्ये कॉंग्रेसलाच बहुमत मिळणार असून भाजपचे नेते आपल्या बॅगा घेऊन 7 डिसेंबरला राज्याबाहेर पळ काढतील. निकालानंतर भाजपचे नेते आपलं तोंड लपवायला राज्याबाहेर जातील असे त्यांना सुचवायचे आहे. 

पंतप्रधआन नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले मोदी बेणेश्‍वर इथे सभेला आले तिथे ते देवळात गेल असते तर त्यांच्या पक्षाच्या जागा वाढल्या असत्या, पण आता से होऊनही काही उपयोग होणार नाही, कारण या राज्यात आता जनतेने आम्हाला निवडून द्यायचे ठरवले आहे आमच्या पक्षाचेचे सरकार स्थापन होईल. मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्‍नावर कुणाचेही नाव न घेता ते म्हणाले मुख्यमंत्री कुणीही होऊ शकतो मात्र जो कोणी होईळ तो कॉंग्रेसचाच असेल हे नक्की. 

भाजपच्या वागण्यात आणि कृती करण्यात खूपच अंतर आहे, या पक्षाने तरुणांना रोजगार देण्याचे नुसतेच आश्‍वासन दिले, या आश्‍वासनाप्रमाणेच अन्य अनेक आश्‍वासने पाळलेली नाहीत. या सकारने सर्व थरातील लोकांची निराशा केली आहे असा आरोपही त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com