दानवेंनी खोतकरांना खूप त्रास दिला : रामदास कदम

अर्जुन खोतकर हे माझे मित्र असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांना खूप त्रास दिला आहे. दानवेंनी सुडाच्या भावनेने काम केल्याचा बदला घेण्याची खोतकर यांची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले.
दानवेंनी खोतकरांना खूप त्रास दिला : रामदास कदम

मुंबईत : अर्जुन खोतकर हे माझे मित्र असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांना खूप त्रास दिला आहे. दानवेंनी सुडाच्या भावनेने काम केल्याचा बदला घेण्याची खोतकर यांची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले.

साम टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत रामदास कदम यांनी हे वक्तव्य केले. जालन्यात रावसाहेब दानवे विरुद्ध राज्यमंत्री अर्जुन खोतकर असा वाद धुमसतो आहे. युती होऊनही आपण निवडणूक लढवणार असल्याचं अर्जुन खोतकर यांनी जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेणार असून, खोतकर यांना मी आज मंत्रालयात भेटायला बोलावलं आहे, असंही रामदास कदम यांनी सांगितले.

"भाजप आणि शिवसेनेची युती हा योग्य निर्णय आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला आहे. टोकाची टीका केली तरी राजकारणात कुणी कुणाचा दुश्मन नसतो. फारकाळ मित्रही नसतो. मात्र अनेक अटी मान्य केल्यानंतर ही युती करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून योग्य ते निर्णय घेतील," असे युतीबाबत बोलताना कदम म्हणाले. नारायण राणे यांच्याबाबत विचारले असता, "नारायण राणे हा विषय आता संपला आहे. त्यांच्याबाबत बोलणं म्हणजे त्यांना उगाच किंमत देण्यासारखे आहे," असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com