शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीचा ग्रामसभेत ठराव घ्या : राजू शेट्टी

ग्रामपंचायत ते संसद असा लढा उभारण्याची रणनिती आखण्यात आली आहे. राज्यात 1 मे रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत संपूर्ण कर्जमुक्ती व उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव या दोन विधेयकांचा तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी करणारे ठराव घेण्याचे आवाहान खासदार शेट्टी यांनी केले आहे. यासाठी खासदार शेट्टी लवकरच राज्यातील ग्रामपंचायतींशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
 शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीचा ग्रामसभेत ठराव घ्या : राजू शेट्टी

अकोला : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेत मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावासह विविध प्रश्न सोडविण्यासाठी संसदेचे सात दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करणारा ठराव 1 मे रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत घेण्याचे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला "अच्छे दिन' दाखविण्याच्या भुलथापा देऊन भाजप सरकार सत्तेत आले. मात्र, निवडणुक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न करता अनेक शेतकरीविरोधी निर्णय घेऊन भाजपने शेतकऱ्यांना "बुरे दिन' दाखविले आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी अशा अनेक शेतकरीहिताच्या मागण्या पूर्ण न करता मोदी सरकार शेतकऱ्यांच्या जखेवर मीठ चोळत आहे असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. 

ते म्हणाले , "" भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असून हजारो कुटुंबे उघड्यावर आली आहेत. शेतकऱ्यांची झालेली दयनिय अवस्था दुर करण्यासाठी देशातील 193 शेतकरी संघटनांनी वज्रमुठ बांधत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती स्थापन करून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध लढा उभारला आहे. 

या लढ्याला आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, टीएसआर, टिडीपी, वायएसआर, सीपीआय, सीपीएम, आजेडी, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी, एआयडीएमके, बीजेडी, डीएमके, जेडीयु, आम आदमी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्यांचे समर्थन मिळाले आहे. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणे, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव यासह इतरही ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी संसदेचे सात दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी खासदार शेट्टी यांनी केली आहे. 

ग्रामपंचायत ते संसद असा लढा उभारण्याची रणनिती आखण्यात आली आहे. राज्यात 1 मे रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत संपूर्ण कर्जमुक्ती व उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव या दोन विधेयकांचा तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी करणारे ठराव घेण्याचे आवाहान खासदार शेट्टी यांनी केले आहे. यासाठी खासदार शेट्टी लवकरच राज्यातील ग्रामपंचायतींशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com