कोल्हापूर : शेतमालाला हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी किसान संघर्ष समितीने 30 नोव्हेंबरला संसदेला घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना निमंत्रण दिले असल्याचे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेटटी यांनी सांगितले.
कोल्हापूर येथील सर्किट हाउस येथे पवार-शेटटी यांच्यात अर्धा तास चर्चा झाली.
अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने 29 व 30 नोव्हेंबरला संसदेला घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज खासदार शेटटी यांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांची कोल्हापूर येथील सर्किट हाउस येथे भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय, साखर उद्योगातील अडचणी, एफआरपीचा बेस रेट बदलल्याने शेतकऱ्यांचा होत असलेला तोटा आदी विषयावर चर्चा झाली. यावेळी दिल्ली येथील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन खासदार शेटटी यांनी पवार यांना केले.
यावेळी बोलताना खासदार शेटटी म्हणाले, संसदेला घेराव घालण्याचे निमंत्रण खासदार पवार यांनी स्विकारले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेतच. मात्र विविध राजकीय पक्ष व संघटनांनाही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी खासदार पवार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.