आघाडीत किमान तीन जागा मिळण्याची राजू शेट्टींची मागणी

सरकारविरोधी वातावरणनिर्मिती आम्ही केली. त्यामुळे त्याचे फळ कार्यकर्त्यांना मिळाले, त्यामुळे भाजप विरोधी आघाडीत आम्हाला किमान तीन तरी जागा द्याव्यात, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
 आघाडीत किमान तीन जागा मिळण्याची राजू शेट्टींची मागणी

मुंबई : सरकारविरोधी वातावरणनिर्मिती आम्ही केली. त्यामुळे त्याचे फळ कार्यकर्त्यांना मिळाले, त्यामुळे भाजप विरोधी आघाडीत आम्हाला किमान तीन तरी जागा द्याव्यात, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

साम टिव्हीशी बोलताना शेट्टी म्हणाले, "आघाडीला आम्ही सहा जागांची यादी दिली आहे. पण आघाडीधर्म पाळताना तीन जागा तरी आम्हाला द्याव्यात, अशी आमची मागणी आहे. वंचित विकास आघाडी किंवा आपच्या आघाडीबरोबर आमची  चर्चा झालेली नाही. पण आम्ही एनडीएबरोबर जाणार नाही हे निश्चित आहे." आघाडीने आमच्या ताकदीनुसार आम्हाला जागा द्यायला हव्यात. भाजपविरोधी आघाडीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा, असेही शेट्टी म्हणाले.

नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या किसान मार्च बाबत शेट्टी म्हणाले, "किसान मोर्चाला रोखून धरणे ही दडपशाही आहे सरकारनं गेल्यावेळी आश्वासन दिले. पण त्याची पूर्तता केली नाही हा तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.   शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. सरकारकडून सातत्यानं फसवणूक होते आहे,  त्यामुळे त्यांना सातत्याने मोर्चे काढावे लागत आहेत.

राजू शेट्टी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com